ylliX - Online Advertising Network

ShivajiMaharaj AttackOn Surat ! छत्रपती शिवरायांच्या त्रंबकेश्वर भेटीला 358 वर्षे पूर्ण! हा आहे पुरावा

त्या 31 डिसेंबरला राजे छत्रपती शिवरायांच्या त्र्यंबकेश्वर भेटीला 358 वर्षे पूर्ण होत आहे. 31 डिसेंबर 1663 ला छत्रपती शिवाजी महाराज प्रथमच त्रंबकेश्वर ला आले होते. राजे छत्रपती शिवराय यांनी  त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलें.ShivajiMaharaj AttackOn Surat
सुरतेवर स्वारी करण्यासाठी जव्हार मार्गे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन ते रवाना झाले. वेदमूर्ती आप्पा देव भट ढरगे त्यांचे क्षेत्र उपाध्याय होते. इसवी सन 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबक गड , ब्रह्मगिरी उर्फ त्र्यंबक गड व त्रंबक गाव जिंकून घेतले, 351 वर्ष या माहिती झाले आहे.वरील माहिती त्रंबकेश्वर मधील एका जुन्या फलकानुसार असून फलक वर माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कृत शिवस्पर्श मधील आहे. दरम्यान आता पूर्वीचे ताम्रपत्र इतिहास संशोधक पुण्याच्या म्युझियममध्ये आहे . चेतन ढरगे ,सुरेश ढरगे यांचे कडून झेरॉक्स फोटो संग्रहित .
त्र्यंबकेश्वरला छत्रपती भोसले घराण्याचे तिर्थोपाध्याय ढेरगे गुरूजी यांच्या संग्रही तत्कालीन कौलनामे, पत्र यांच्या फोटो कॉपी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान त्र्यंबकराजास पूजा अभिषेक केला तेव्हा त्यांचे पौरोहित्य ढरेगे यांचे पूर्वज आपदेवभट ढेरगे यांनी केले होते. त्र्यंबकेश्वरला पारंपरिक तिर्थोपाध्यायांची घरे आहेत. त्यांच्याकडे नामावळी म्हणजेच वंशावळीदेखील आहेत. शेकडो वर्षांपूर्वी येथे आलेले भाविक या नामावळीत आपला आपले नाव लिहून स्वाक्षरी करीत, तसेच अभिप्राय लिहीत असत. या वंशावळीची गरज भासल्यास राजदरबारात, न्यायालयात पुरावे म्हणून देखील सादर केल्याचे सांगितले जाते. अशाच नामावळीत शिवाजीराजे यांची स्वाक्षरी आहे. महाराज ३१ डिसेंबर १६६३ रोजी त्र्यंबकेश्वर येथे आले आणि १ जानेवारी १६६४ रोजी ते सुरतकडे निघाले व जव्हारजवळ पोहचले, असा उल्लेख शिवचरीत्रात आढळतो. त्यावेळी त्यांच्यासोबत निवडक चार हजार घोडेस्वार होते.chhatrapati shivajimaharaj nashik!

Shivaji Maharaj Attack On Surat  | छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवरील पहिली स्वारी

छ. शिवाजी महाराजांच्या चरित्रात सुरत प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. कारण सुरतेवरची छ. शिवाजी महाराजांच्या मोहीमेने महाराजांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. मुघल साम्राज्यात दिल्ली खालोखाल महत्त्व असलेले सुरत शहर एक जागतिक व्यापारी केंद्र होते. मुघल साम्राज्याची शान असलेल्या या शहरावर छ. शिवाजी महाराजांनी छापा टाकून जबरदस्त खंडणी वसूल केली. आजच्या या लेखात आपण छ. शिवाजी महाराजांच्या सुरते वरील पहिल्या स्वारीची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवरील पहिली स्वारी माहिती 2021 | Shivaji Maharaj Attack On Surat In Marathi

सुरतेवर स्वारीचे प्रमुख तत्कालीन कारण –

शाइस्तेखानाने तीन वर्षे स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. सलग तीन वर्षे स्वराज्यात मुघल फौजा नासधूस करीत होत्या. त्यामुळे स्वराज्याची आर्थिक घडी विस्कटली. छ. शिवाजी महाराज प्रजावत्सल होते. अशा बिकट प्रसंगी ते प्रजेकडून कसा कर वसूल करतील ? परंतु पैशाशिवाय कार्य कसे होतील ? स्वराज्यापुढे भरपूर प्रश्न होते. अनेक मोहिमा पुढे होत्या. स्वराज्याचे आरमार बळकट करायचे होते. नवीन किल्ले बांधणे वा किल्ल्यांची डागडुजी करणे. फौज उभारणे, तोफा,दारूगोळा विकत घेणे.

अशा कामांसाठी भरपूर निधी पाहिजे होता. त्यामुळे शत्रुराज्यात छापा टाकून खंडणी वसूल करणे काही गैर नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील वैभवशाली अशा सुरत वर हल्ला करून खंडणी वसूल करण्याचे ठरविले.

बहिर्जी नाईक सुरतेकडे रवाना –

महाराज कोणतेही काम तयारीनिशी करीत. जी कोणतीही मोहीम ते ठरवीत असत त्याबाबतची माहिती अगोदर मिळवून त्यानुसार अंमल बजावणी करीत. महाराजांनी आपला सर्वात कुशल हेर बहिर्जी नाईक यांना सूरतेकडे रवाना केले. कारण राजगडपासून सुरत सुमारे दीडशे कोस आहे. मुघल साम्राज्यात आत खोलवर सुरत वसलेले होते. एवढ्या आत शिरून सुरते वर छापा म्हणजेच Shivaji Maharaj Attack On Surat टाकून खंडणी वसूल करून सहिसलामत परत येणे कठीण. त्यामुळे अगोदर सुरतेची इत्यंभूत माहिती काढण्यासाठी बहिर्जी नाईक यांचे कडे जबाबदारी महाराजांनी दिली.

सुरतमधील तत्कालीन परिस्थिती –

सुरत हे एक जागतिक व्यापाराचे केंद्र होते. सुरतेच्या बंदरातून भारताचा उर्वरित जगाशी व्यापार चाले. कापड, मसाल्याचे जिन्नस,चंदन, कस्तुरी, हस्तिदंताच्या सुशोभित वस्तू, अत्तर रेशीम, जरीचे कापड, नक्षीदार भांडी, गालिचे याशिवाय गुलाम आणि स्त्रियांचा खरेदी – विक्रीचा व्यापार येथे होता.
सुरतची तत्कालीन लोकसंख्या सुमारे २ लाख होती. सुरत शहरजवळून तापी नदी वाहत होती. सुरतमध्ये इंग्रज आणि डच यांच्या वखारी होत्या.
औरगजेबाने सुरतेच्या रक्षणासाठी पाच हजार सैनिकांची तजवीज केली होती. मात्र सुरत चा सुभेदार इनायतखान याने केवळ १ हजारच फौज ठेवली होती. सुरत मध्ये हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा असे श्रीमंत व्यापारी होते.

सुरतेकडे प्रयाण –

सुरतेची खडानखडा माहिती घेऊन बहिर्जी नाईक राजगडावर येऊन पोचले. महाराज देखील बहिर्जींची आतुरतेने वाट पाहत होते. बहिर्जी नाईक यांनी महाराजांना सुरतेची सर्व माहिती दिली. आणि महाराजांचा बेत पक्का झाला. सुरतेवर छाप मारून खंडणी वसूल करायचीच.

सर्व जंगी तयारी झाली. सुसज्ज लष्कर घेऊन महाराज ६ डिसेंबर १६६३ ला राजगडहुन सुरतकडे निघाले. महाराजांच्या लष्कराचा आकडा काही ठिकाणी ५ हजार आहे तर काही ठिकाणी ८ हजार दिला आहे. महाराज अगोदर त्रंबकेश्र्वर येथे गेले. तेथे गेल्यावर त्यांनी त्रंबकेश्र्वराची विधिवत पूजा केली. महाराजांनी तेथे हुल उडवून दिली की आपण औरंगाबादला जाणार आहोत. त्यामुळे औरंगाबाद कडील सर्व ठाणे सुसज्ज झाले. आणि महाराजांचा विरोध करण्यास सज्ज झाले. त्याचा परिणाम असा झाला की सुरतेचा रस्ता बिनधोक झाला. महाराज सहसा दिवसा मुक्काम करीत आणि रात्री प्रवास करीत.ShivajiMaharaj AttackOn Surat

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.